अंघोळ करताना 'या' चूका टाळा... नाहीतर, आरोग्यास होईल मोठं नुकसान
Photo Credit; canva
फिट आणि हेल्दी राहण्यासाठी शारिरीक स्वच्छतेकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी दररोज अंघोळ करणं गरजेचं आहे. अंघोळ केल्याने आपलं शरीर स्वस्थ राहतं आणि मूड देखील चांगला होतो.
Photo Credit; canva
मात्र, अंघोळ करतेवेळी आपण अशा काही चूका करतो, ज्यांच्या मुळे आपल्या स्वास्थ्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.
Photo Credit; canva
अंघोळ करताना कोणत्या चूका करू नयेत आणि काय करावं?, याविषयी सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; canva
आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर लगेच अंघोळ करू नये. जेवल्यानंतर तेव्हा पचनक्रियेला चालना मिळण्यासाठी ब्लड सर्क्यूलेशन वाढतं.
Photo Credit; canva
तसेच, अंघोळ करतेवेळी हे ब्लड सर्क्यूलेशन म्हणजेच शरीरातील रक्तप्रवाह मंद होतो. यामुळे पचनक्रियेत बाधा येऊ शकते. त्यामुळे काही खाल्ल्यानंतर 1 ते 2 तासांनंतर अंघोळ केली पाहिजे.
Photo Credit; canva
अनेकांना खूप गरम पाण्याने अंघोळ करणं सोयीस्कर वाटतं. मात्र, हे त्वचेसाठी योग्य नसतं. जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराचं नैसर्गिक तेल निघून जातं आणि त्वचा ड्राय, निस्तेज दिसू लागते. त्यामुळे कोमट पाण्याने अंघोळ करणं फायदेशीर असतं.
Photo Credit; canva
बरेच लोक अंघोळ करताना अधिक प्रमाणात केमिकल्स असलेल्या साबणाचा किंवा बॉडी वॉशचा वापर करतात. असं केल्याने हे केमिकल्स शरीरात जातात आणि स्वस्थ्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; canva
वर्कआउट केल्यानंतर आपलं शरीर गरम होतं आणि त्यामुळे घाम येऊ लागतो. अशात, वर्कआउट केल्यानंतर लगेच अंघोळ केल्याने शरीराचं तापमान अचानक बदलू शकतं.
Photo Credit; canva
अशा चुका केल्याने आरोग्यासंबंधी बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. वर्कआउट केल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे आरामात बसा आणि त्यानंतर अंघोळ करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पाण्यात फक्त 'हा' एकच पदार्थ मिसळा अन् रोज सकाळी प्या..चरबी झरझर वितळेल