फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. पण त्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी प्रचंड वाढत असते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसकडून सांगण्यात आले की, मधुमेहाच्या रुग्णांनी संतुलित आहाराचा भाग म्हणून दररोज फळांचे सेवन करावे.
परंतु काही फळे अशी आहेत जी मधुमेहाच्या रुग्णांनी कधीच खाऊ नये.
अशी काही फळे आहेत ज्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत, रक्तातील साखरेची पातळी वाढू नये यासाठी काही फळांची निवड योग्य पद्धतीने करणेच चांगले असते.
टरबूजमध्ये साखरेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांना टरबूज अत्यंत मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
केळीची जीआय पातळी जास्त असते परंतु बदाम, पिस्ता आणि अक्रोडमध्ये साखरचे प्रमाण असते. मात्र टाइप 2 मधुमेह असलेले लोकं केळी दह्यात मिसळून खाऊ शकतात.
आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. पण मधुमेही रुग्णांनी ते काळजीपूर्वकच खावे. कारण एका आंब्यामध्ये 14 ग्रॅम साखर असते, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरित्या वाढू शकते.
अननस त्यात 16 ग्रॅम साखर असते. त्याची जीआय पातळी खूपच कमी आहे आणि त्यात भरपूर चरबी आणि प्रथिने आहेत.
लिचीमध्ये 16 ग्रॅम साखर असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनीही विचारपूर्वकच सेवन करावे.