तुमच्या आयुष्यातील फक्त 'या' 10 सवयी बदला, आणि फरक बघा
माणसाच्या वाईट सवयी याच खऱ्या त्याच्या मोठ्या शत्रू आहेत. त्या वाईट सवयीमुळेच तो मृत्यूलाही आमंत्रण देत असतो.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्यात वाईट सवय म्हणजे दिवसभर फोन आणि लॅपटॉप वापरणे. त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवर होत असतो.
तुम्हाला कमी झोप लागणे ही सुद्धा खूप वाईट सवय आहे. कमी झोप होत असेल तर तुमचे शरीर अनेक आजारांना ते बळी पडत असते.
मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे ही सवयही आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल, हृदय, यकृत आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढत असतो.
सिगारेट, बिडी किंवा दारू पिल्यामुळे शरीर कमकुवत होते. त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कायम असतो.
सलग कितीतरी वेळ बसणेही आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
रिफाइंड साखर किंवा मैदा खाणेदेखील आरोग्यासाठी धोकादायक आहे. या सवया तुमचं आयुष्य कमी करत असतात.
तसेच जास्त मीठ खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तुमच्या रक्तदाबाची पातळी वाढत असते. त्याचबरोबर लठ्ठपणाबरोबरच ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही वाढवू शकते.
अन्न नीट न चघळणे ही सवयदेखील चांगली नाही. कारण यामुळे अॅसिडिटीसारख्या पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
झोपण्याआधी काहीही खात राहणे हीसुद्धा एक वाईट सवय आहे. काहीही खायचे असेल तर ते दोन तास आधी खाणे गरजेचे आहे.