उत्तर काशीमध्ये ज्या दिवशी टनेलमध्ये 41 मजूर अडकले होते. त्यादिवसांपासून त्या मजूरांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते.
उत्तर काशीमधील एका टनेलमध्ये गेल्या 17 दिवसांपासून 41 मजूर अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमने प्रयत्नांच्या पराकाष्टा करून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
टनेलमध्ये जे 41 मजूर अडकून राहिले होते, त्यांना तब्बल 400 तासानंतर बाहेर काढण्यात आले आहे.
उत्तर काशीत अडकलेल्या 41 मजूरापैकी पहिल्या मजूराला 7.50 मिनिटांनी बाहेर काढण्यात आले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि अन्य राजकीय नेत्यांनी मजूरांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. संवाद साधल्यानंतर मजूरांना रुग्णालयात पाठवण्यात आले.
टनेलमधील मजूरांना 17 दिवसांनी बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना सर्वप्रथम रुग्णालयात पाठवण्यात आले.
सिलक्यारा टनेलमधून मजूर अडकल्यापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. त्यांना बाहेर काढताना त्यांचे कुटुंबीयही तिथे उपस्थित होते. त्यामुळे कामगार बाहेर आल्यानंतर कामगारांपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांना जास्त आनंद झाल्याचे पाहायला मिळाले.
Weight Gain: ‘हे’ 5 पदार्थ खाऊन 20 दिवसातच वाढेल वजन!