'या' 5 ठिकाणी घर घेणं... नरकाहून कमी नाही! चाणक्य नितीमध्ये काय सांगितलंय?
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात अशा पाच ठिकाणांविषयी सांगितलं आहे, जिथं कोणत्याच व्यक्तीने आपल्या स्वप्नातील घर बांधू नये.
Photo Credit; instagram
चाणक्य यांनी 'लोकयात्रा भय लाज योग्य त्याग । पंच यत्र न वर्तन्ते न कुर्यात् तत्र संस्थतिः ॥' हा श्लोक देखील सांगितला आहे.
Photo Credit; instagram
या श्लोकद्वारे चाणक्य यांनी व्यक्तीला कोणत्या ठिकाणी घर घेऊ नये, याबद्दल सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
ज्या ठिकाणी उपजीविकेचं साधन किंवा व्यवसाय नाही त्या ठिकाणी माणसाने राहू नये.
Photo Credit; instagram
उत्पन्नाशिवाय मनुष्य त्याच्या गरजा भागवू शकत नाही. त्यामुळे उत्पन्नाचं स्रोत लक्षात घेऊन घराचं ठिकाण निवडावं.
Photo Credit; instagram
ज्या ठिकाणी भितीचं वातावरण जाणवल्यास त्या ठिकाणी कधीच घर घेऊ किंवा बांधू नका.
Photo Credit; instagram
जिथे लोकांना समाज किंवा कायद्याची भीती वाटत नाही, अशा ठिकाणी राहू नये. अशा ठिकाणी राहणं कुटुंबाचं नुकसान होण्याला कारणीभूत ठरू शकतं.
Photo Credit; instagram
ज्या ठिकाणी सार्वजनिक लाजेची किंवा प्रतिष्ठेची काळजी घेतली जात नाही अशा ठिकाणी घर बांधू किंवा घेऊ नये. कारण अशा ठिकाणी राहिल्याने आदर मिळत नाही आणि इतरांप्रति आदराची भावना कमी होते.
Photo Credit; instagram
जिथे परोपकारी लोक नाहीत आणि जिथे व्यक्तींमध्ये त्यागाची भावना नाही अशा ठिकाणी राहणे देखील टाळावे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुमचे अंडरआर्म्स दिसतील आकर्षक, काळेपणा दूर करण्याच्या 'या' आहेत टिप्स