गुरुवार हा गुरु ग्रह आणि भगवान विष्णूचा दिवस असल्याचं सांगितलं जातं. हे विद्या, समृद्धी आणि आर्थिक प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, कापूर शुक्र ग्रहाशी संबंधित असतो.
Photo Credit; instagram
गुरुवारच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या ठिकाणी किंवा स्वयंपाकघरात विशेषत: दक्षिण-पूर्व दिशेत तूपामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सकारात्मक होतं. तसेच आर्थिक समस्याही दूर होतात.
Photo Credit; instagram
घराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला पिवळ्या कपड्यात कापूर बांधून लटकवा. असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि पैशांना आकर्षित करणारी सकारात्मक ऊर्जा वाढते.
Photo Credit; instagram
रात्रीच्या वेळी स्वयंपाकाचं काम उरकल्यानंतर चांदीच्या वाटीत कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि शांततापूर्ण राहते.
Photo Credit; instagram
पूजा करताना सकाळी आणि संध्याकाळी तूपात कापूर जाळणं शुभ मानलं जातं. यामुळे वास्तू दोष कमी होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो.
Photo Credit; instagram
कोणाच्याही कुंडलीत ग्रहांची अशुभ स्थिती असल्यास 43 दिवस कापूरचा हा उपाय करा. यासोबतच नियमित गुरुवारचं व्रत आणि भगवान विष्णूची पूजा करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सोमवारी जन्मलेले लोक असतात खास! का म्हणून काय विचारताय?