आता चिंता करा मिनिटांत दूर; प्रेमानंद महाराजांनी सांगितला 'हा' उपाय
Photo Credit; instagram
सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या चिंता किंवा तणावाचा सामना करत असते. मन शांत ठेवणं आणि नकारात्मक विचार दूर करणं, हे सध्या कठीण होऊन बसलं आहे.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांना त्यांच्या भक्ताने जीवनातील चिंता दूर करण्याचा उपाय विचारला असता महाराजांनी यावर प्रभावी आणि सोपा उपाय सांगितला आहे.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांच्या मते, जर आपलं मन रिक्त म्हणजेच काहीच विचार नसतील तर त्यात चिंता, तणाव आणि नकारात्मक विचार येत असतात. त्यामुळे मन रिकामं न ठेवता नेहमी देवाचं चिंतन करत राहा.
Photo Credit; instagram
जर आपल्या मनात देवाची भक्ती आणि चिंतन असेल तर तुमच्या मनातील काळजी आणि चिंता काही मिनिटांतच दूर होईल, असं महाराजांनी सांगितलं.
Photo Credit; instagram
जो मनातील द्वेष भावना नष्ट करुन आनंदाने देवाचं चिंतन करतो, तोच खरा विवेक असल्याचं प्रेमानंद महाराजांनी सांगितलं.
Photo Credit; instagram
अध्यात्मिकतेशिवाय आपण आपल्या मनातील नकारात्मक भावना दूर करु शकत नाही. देवाचं चिंतन करणं हेच मनातील चिंतेचं समाधान ठरू शकतं.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांच्या मते, जर कोणती व्यक्ती आपल्याला वाईट म्हणाली तर ही आपल्या कर्माची फळं असून ती व्यक्ती फक्त निमित्त असल्याचा विचार करा. यामुळे मनातील द्वेष दूर होईल.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराज म्हणतात, "धन्य आहात प्रभु! माझ्या पापांची शिक्षा देऊन तुम्ही मला शुद्ध करता."
Photo Credit; instagram
जेव्हा आपण शुद्ध भावनाने देवाच्या नावाच जप करतो, तेव्हा आपल्यातील विवेक जागतो. हाच विवेक आपल्या मनातील चिंता आणि नकारात्मक विचार दूर करत असल्याचं महाराजांनी सांगितलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मुलांनो! सकाळी उठल्यानंतर फक्त 'हे' करा, यश आपोआप...