Blood Sugar नियंत्रणात आणण्यासाठी 'हे' आहेत रामबाण उपाय
खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे अनेक आजारांचा धोका वाढत असतो. त्याचा वाईट परिणाम
अनियमित खाण्याच्या सवयीमुळे मधुमेह आणि इतर आजार वाढण्याचीही कारणं आहेत.
मधुमेह हा एक आजार असला तरी त्याच्यामुळे शरीरातील अनेक भागावर वाईट परिणाम होतात.
मधुमेह झाल्यानंतर अनेक रोगांना तो आमंत्रण देतो म्हणूनच मधुमेहाला सायलेंट किलर म्हणतात.
जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो तेव्हा तुम्हाला तुमचे डोळे, मूत्रपिंड, यकृत, हृदय आणि पायाच्या समस्या वाढल्याचे दिसून येते.
मधुमेह टाळायचा असेल तर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचे सेवन करा.
गाजर हे ही महत्वाचा आहार आहे. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि अनेक खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या आहारात गाजराचा समावेश करावा.
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कोबी खूप फायदेशीर आहे. कोबीमध्ये स्टार्चचे प्रमाण खूपच कमी असते.
फळांमध्ये संत्र्याला सुपरफूड मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही संत्री हे ही खूप फायदेशीर आहे.