आले हे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आले खाल्ल्याने त्याचा आरोग्याला दुहेरी फायदा होतो.
आल्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि वेदना आणि चिडचिड यापासूनही आराम मिळतो. त्याचबरोबर आले खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
आले शरीरातील पाचक रस वाढवते. याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी आले खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
आल्याचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते व स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो.
आल्याचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रियाही सुधारते. हे रोज खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही निघून जाते.
आल्यामध्ये कर्करोगाशी लढणारे अनेक घटक आढळतात. त्याचे पाणी फुफ्फुस, प्रोस्टेट, अंडाशय, कोलन, स्तन, त्वचा आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगापासून संरक्षण करते.
आले खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. हे रोज खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन यांसारख्या आजारांचाही धोका कमी होतो.
आल्यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे सर्दी आणि फ्लू कमी करू शकतात.
Bollywood च्या प्रचंड आवडीचा आहे जयपुरमधील ‘हा’ प्रसिद्ध किल्ला!