Lok Sabha Election 2024: मोदी म्हणाले 'भटकती आत्मा...' ठाकरे म्हणतात 'एक वखवखलेला आत्मा...', पुण्यात प्रचाराला धार

मुंबई तक

ADVERTISEMENT

ठाकरे म्हणतात 'एक वखवखलेला आत्मा...',
ठाकरे म्हणतात 'एक वखवखलेला आत्मा...',
social share
google news

pm modi vs Uddhav Thackeray: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) पुण्यातील खडकवासला येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेते एकत्र आले होते. याच जाहीर सभेत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'एक  वखवखलेला आत्मा' असं विधान करत थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली. सोमवारी (29 एप्रिल) मोदींनी भटकती आत्मा असं म्हणत पवारांवर टीकेची झोड उठवली होती. ज्याला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युतर दिलं आहे. (pm odi Says sandering soul thackeray says atma edge in pune)

'पुण्यातील सभेत उद्धव ठाकरेंनी PM मोदींना दिलं जोरदार प्रत्युत्तर...'

कोणत्या भाषेत तुम्ही बोलता आहात? तुम्ही 10 वर्ष काय केलं ते सांगा.. अजूनही यांच्या मानगुटीवर जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाही. म्हणजे 10 वर्ष झाले मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात. चिमटे काढून बघा तुम्ही स्वत:ला.. की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होतात.. कारण आता तुमची खुर्ची जातेय.' 

'यांची भाषा एवढी खाली आलीए.. मला असं वाटतं की, आज अजित पवार म्हणाले की, मी त्यांना पुढच्या सभेत विचारेन.. की, भटकती आत्मा बोललेत.. भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात.. पवार साहेबांना बोललात?' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'जशी भटकती आत्मा असते ना.. तसा एक वखवखलेला आत्मा सुद्धा असतो. वखवखला आत्मा कसा असतो माहितीए.. हा सगळीकडे जातो.. सगळं काय.. पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायेत.. मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वत:साठी लढतायेत.'. 

'मुख्यमंत्री बनायला लोकांची मतं लागतात.. ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचं अध्यक्ष केलंय शाहांनी त्यांच्या मुलाला. तसं नाहीए.. हा वखवखलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये.. 15-20 सभा घेताय.. पण त्या वखवखलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे-जिथे फिरतायेत तिथे तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या आत्म्याकडे बघा, त्यांच्या घराकडे बघा.. त्यांच्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा.' 

ADVERTISEMENT

'महाराष्ट्र भोळा आहे, साधा आहे..  दिलदार आहे, पण महाराष्ट्र कृतघ्न नाहीए, महाराष्ट्र गद्दार नाहीए.. महाराष्ट्राची परंपराही शूरांना वंदन करण्याची आहे. आज भाजपचे जे चाललंय ते चोरा आम्ही वंदिले असं चाललं आहे.' 

ADVERTISEMENT

'कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल.. पण असाच एक वखवखलेला आत्मा 300 किंवा 350 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला.. तो आलेला महाराष्ट्रवर चालून..' 

'27 वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रात आला त्याने परत कधी आग्रा बघितलंच नाही.. इकडेच त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल कुठेतरी.. ही अशी वखवख बरी नाही.' 

'ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला.. मी तर दर सभेत  विचारतो.. पवार साहेब कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं.' असं घणाघाती भाषण ठाकरेंनी यावेळी केलं. 

PM मोदींनी शरद पवारांवर नेमकी काय टीका केली?

दरम्यान, 29 एप्रिलला पंतप्रधान नेमकं काय म्हणाले होते ते पाहा.. 

'आमच्याकडे असं म्हटलं जातं की, आपल्याकडे काही 'भटकती आत्मा' असतात.. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांचे स्वप्न अपूर्ण राहतात ते आत्मे भटकत राहतात. स्वत:चं काही झालं नाही तर दुसऱ्यांच्या गोष्टी बिघडविण्यात त्यांना मजा येते.' 

'आमचा महाराष्ट्र देखील अशा भटकती आत्म्यांचा शिकार झाला आहे. आजपासून 45 वर्षांपूर्वी येथील एका मोठ्या नेत्याने स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र हा अस्थिरतेमध्ये गेला. यामुळेच अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाहीत.'

'2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा एवढा मोठा अपमान केला हे महाराष्ट्रातील जनता निश्चितच जाणून आहे. आज फक्त महाराष्ट्राला अस्थिर करणं हे या आत्म्याला समाधान मिळत नाही तर देशाला अस्थिर करण्याचा खेळ सुरू आहे.' 

'आज भारताला अशा भटकती आत्मापासून वाचवून देशात एक स्थिर, मजबूत सरकार देऊन पुढे जाणं गरजेचं आहे.' असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. असं मोदी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT