Amethi Lok Sabha : स्मृती इराणींविरोधात 'निष्ठावंता'ला तिकीट, काँग्रेसचे केएल शर्मा कोण?
Who Is Kishori Lal Sharma : स्मृती इराणी यांच्याविरोधात काँग्रेसने यावेळी किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
ADVERTISEMENT
Kishori Lal Sharma Amethi Lok Sabha Election : अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसला बालेकिल्ला अशी अमेठीची ओळख आहे. पण, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. यावेळी कोण, असा प्रश्न चर्चेत होता. अखेर काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी किशोरी लाल शर्मा यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे ते कोण आहेत, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
हे तेच केएल शर्मा आहेत, जे गांधी कुटुंबाच्या अनुपस्थितीत अमेठी आणि रायबरेलीमध्ये काम पाहतात. या लोकसभा मतदारसंघामध्ये शर्मा यांना गांधी कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून ओळखलं जातं.
किशोरी लाल शर्मा यांच्याबद्दल...
काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा हे मूळचे आहेत पंजाबमधील लुधियानाचे. 1983 मध्ये केएल शर्मा यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. १९९१ मध्ये राजीव गांधी यांचे निधन झाले. त्यानंतर केएल शर्मा हे गांधी कुटुंबाच्या जवळ येत गेले. अमेठी आणि रायबरेलीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अमेठी आणि गांधी कुटुंब
काही अपवाद सोडले तर अमेठीतून नेहमी गांधी कुटुंबातील व्यक्तीच जिंकली आहे. १९६७ आणि १९७१ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विद्याधर वाजपेयी यांचा विजय मिळाला होता. त्यानंतर १९७७ मध्ये जनता पक्षाच्या रवींद्र प्रताप सिंह यांचा विजय झाला होता.
१९८० मध्ये या जागेवरून काँग्रेसचे संजय गांधी विजयी झाले होते. १९८१ मध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्याचबरोबर १९८४, १९८९ आणि १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधीच विजयी झाले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> शिवसेनेच्या आणखी एका खासदाराचा पत्ता कट!
राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर १९९१ मधील पोटनिवडणुकीत आणि १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या सतीश शर्मा यांचा विजय झाला होता.
ADVERTISEMENT
१९९८ मध्ये या मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला होता. १९९९ मध्ये माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी विजय झाल्या होत्या. त्यानंतरच्या तीन निवडणुकींमध्ये म्हणजेच २००४, २००९ आणि २०१४ मध्ये राहुल गांधी विजयी झाले होते.
हेही वाचा >> भाजप-एनडीए किती जागा जिंकेल? पवारांनी थेट आकडाच सांगितला
२०१९ मध्ये राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा ५५,१२० इतक्या मताधिक्याने पराभूत केले होते. स्मृती इराणी पुन्हा येथून निवडणूक लढवत असून, अमेठी लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात मतदान असणार आहे.
ADVERTISEMENT