Lok Sabha Election 2024: 'तुम्ही आमच्यासाठी काय केले?' BJP च्या भारती पवारांवर मतदार संतापले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Bharati Pawar: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना मतदारांचा प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. पाहा दिंडोरीत नेमकं काय घडलं.

social share
google news

Bharati Pawar Dindori Lok Sabha: प्रविण ठाकरे, दिंडोरी: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. भारती पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय मंत्रिमंडळात आपले स्थान निश्चित केले. हुशार आणि अभ्यासू खासदार अशी त्यांची लोकसभेत ओळख आहे. तसंच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील त्यांचा बराच दबदबा होता. मात्र, आत याच मतदारसंघात त्यांना सामान्य मतदार थेट सवाल विचारत आहेत. एवढंच नव्हे तर प्रचारादरम्यान त्यांना नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागत आहे. (lok sabha election 2024 what have you done for us voters are angry with bjp candidate and bharti pawar dindori)

नेमकं काय घडलं दिंडोरीत?

2019 लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्या होत्या. तरीही दिंडोरी मतदारसंघातील मतदारांनी त्यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. त्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देखील मिळालं.

दरम्यान, आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आल्यानंतर मतदारसंघात विकास झाला नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी सरकारने ठोस भूमिका घेतल्या नाही असे आरोप त्यांच्यावर केले जाऊ लागले त्यामुळे भारती पवारांबाबत मतदारसंघात काहीशी नाराजी असल्याचं दिसत आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> "राम सातपुते दोन लाख मतांनी पडतील", जानकरांचं मोठं भाकित

आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारती पवार यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. भारती पवार यांचा आज (24 एप्रिल) दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मनखेडा येथे प्रचार दौरा सुरू असताना तेथील नागरिकांनी भारती पवारांना थेट 'तुम्ही आमच्यासाठी काय केले?' असा सवाल करत आपला संताप व्यक्त केला. 

यावेळी भारती पवार यांनी संतापलेल्या नागरिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील नागरिकांचं भारती पवारांच्या उत्तराने समाधान झालं नाही. त्यामुळे त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली. त्यामुळे शेवटी भारती पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

केंद्रीय राज्यमंत्री पदाचा कार्यभार असताना देखील मतदार संघातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे व्यक्त होता न आल्यामुळे भारती पवारांना आता प्रचारात मतदारसंघातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

2019 लोकसभा निवडणुकीत भारती पवारांनी मिळवलेला मोठा विजय

2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवारांनाच पक्षात घेत आपल्याच विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाणांना मोठा धक्का दिला होता. यावेळी भाजपने भारती पवारांना उमेदवारी देत चव्हाणांचं तिकीट कापलं होतं. तरीही या निवडणुकीत भारती पवारांनी तब्बल 5 लाख 67 हजार 470 मिळवलेली. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महालेंना 3 लाख 68 हजार 691 मतं मिळालेली. याशिवाय माकपच्या जीवा गावित यांनीही 1 लाख 9 हजार 570 मतं मिळवलेली.

हे ही वाचा>> देवेंद्रच्या नावावर महाराष्ट्रात जागा येत नाही: पवार

मात्र, आता मतदारसंघातील नाराजी लक्षात घेता भारती पवार यांच्यासाठी यंदाची निवडणूक ही काहीशी कठीण ठरू शकते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT