बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडतेय. या प्रकरणानंतर बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात संताप पसरला आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर राजकारणही तापलं आहे. महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे तर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी विरोधकांवर आंदोलनाचं आरोप केला आहे. आता तात्काळ सुनावणीनंतर या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेंवर कारवाईची अपेक्षा आहे. संपूर्ण बदलापूर शहर आणि रेल्वे स्टेशनवर अस्वस्थता आहे आणि सर्वत्र राजकीय उलथापालथ सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
