Mumbai Pollution : दिल्लीपेक्षाही मुंबईचा हवेचा स्तर खालावला, मुंबईची हवा का होतेय विषारी?

राजधानी दिल्लीची हवा प्रदूषित आहे, या गोष्टी आपण दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऐकत असतो. दिल्लीच्या प्रदुषणाचा विषय तर सुप्रीम कोर्टातही गेलाय. पण दिल्लीचं सोडा, इथे मुंबईतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. दिल्लीप्रमाणेच मुंबईतील हवेचा दर्जाही खालावत चाललाय. हवेत घातक सूक्ष्मकणांचं प्रमाण इतकं वाढलंय की 16 नोव्हेंबरला मुंबईतलं कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच BKC, मालाड इथील हवेची गुणवत्ता ‘अतिशय […]

मुंबई तक

17 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:30 PM)

follow google news

राजधानी दिल्लीची हवा प्रदूषित आहे, या गोष्टी आपण दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऐकत असतो. दिल्लीच्या प्रदुषणाचा विषय तर सुप्रीम कोर्टातही गेलाय. पण दिल्लीचं सोडा, इथे मुंबईतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. दिल्लीप्रमाणेच मुंबईतील हवेचा दर्जाही खालावत चाललाय. हवेत घातक सूक्ष्मकणांचं प्रमाण इतकं वाढलंय की 16 नोव्हेंबरला मुंबईतलं कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच BKC, मालाड इथील हवेची गुणवत्ता ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत होती. AQI म्हणजेच एअर क्वॉलिटी इंडेक्स, ज्याच्यानुसार कोणत्याही ठिकाणाच्या हवेचा स्तर-दर्जा काय आहे हे कळतं, तो AQI आता दिल्लीत जास्त आहे म्हणून चर्चा होतेय. पण 15 नोव्हेंबरला दिल्लीपेक्षाही मुंबईचा AQI जास्त होता. दिल्लीत 331 AQI होता पण मुंबईत AQI 345 वर गेलेला. मुंबईतलं प्रदूषण वाढण्याची कारणं काय आहेत? समजून घेऊयात.

    follow whatsapp