महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या वादाच्या चक्रव्युहात अडकले आहेत. भगतसिंह कोश्यारींकडून सातत्यानं जनतेच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली जात असल्याचं म्हणत विरोधकांनी त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांना हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलीये. भाजपकडून खासदार राहिलेल्या दोन्ही व्यक्तीनींच सरकार घेरल्याचं चित्र आहे. त्यातच आता भगतसिंह कोश्यारी यांनी परत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती ‘मुंबई Tak’ ला सुत्रांनी दिलीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT