नांदगाव विधानसभा मतदारसंघातील वाद विकोपाला पोहोचला आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील तणाव अजूनही कायम आहे. अजित पवारांचे समर्थक समीर भुजबळ यांनी सुहास कांदेंचं काम करण्यास नकार दिला असून, राष्ट्रवादीच्या समर्थकांनी सुहास कांद्यांना उमेदवारी दिल्यास काम करणार नाही अशी भूमिका अधोरेखित केली आहे. अशा भूमिकेमुळे महायुतीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. या दबावामुळे नांदगाव-मनमाड मतदारसंघाची मागणी जोरात आहे. कार्यकर्त्यांनी अजित पवारांसमोर आपले मत स्पष्ट केले आहे, पण या वादाचा परिणाम काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
