मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षावासाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी बौद्ध भिक्कू उपस्थित होते आणि वर्षा निवासस्थानी बुद्ध वंदना देखील घेण्यात आली. भिक्कूंना चिवराचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे बौद्ध मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाद्वारे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने मोठा संदेश दिला आहे. त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी बौद्ध धर्माचा सन्मान राखून वर्षावास कार्यक्रमाचं आयोजन करून धार्मिक सहिष्णुतेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील विविध समाजाच्या लोकांमध्ये एकात्मता वाढविण्याचा संदेश दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
