महाराष्ट्र 1 जूनपासून अनलॉक जरी झाला, तरी मुंबई लोकल सुरू व्हायला इतक्यात परवानगी मिळणार नाहीये. पण मुंबई म्हटलं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला कुणीही मुंबई लोकलच निवडतं. अशात अनलॉक झाल्यानंतर उद्योगधंदेही सुरू झाले, तर प्रवास कसा करायचा हा प्रश्न पडतो. म्हणूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अशी मागणी केली आहे की ज्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT