मुंबई तक: गुलाब आणि त्यानंतर शाहीन वादळामुळे राज्यभरात धुमशान घालणारा पाऊस थांबला असला तरी मात्र राज्याला मुसळधार पावसाचा धोका असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. पुण्यात अवघ्या एक ते दोन तासात अतिमुसळधार पाऊस झाला. ज्याने पुण्यातल्या सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं. येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या इतर भागांनाही पावसाचा असाच तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यांना हा अलर्ट दिलाय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
