महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने जागावाटपची चर्चा जोरदार सुरू आहे. अनेक बैठका पार पडत आहेत. महायुतीत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उरलेल्या साधारण 90 जागांबद्दल चर्चा होईल. तर दुसरीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबाबत अहवाल आल्यानंतर आता अटक कधी होणार हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अहवालात नेमके काय म्हंटले आहे, कोणाची चूक आहे आणि कोण जबाबदार आहे याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
