महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालचा दिवस हा मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणामुळे चांगला गाजला. विरोधकांनी मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनासह अटकेची मागणी लावून धरल्यामुळे अध्यक्षांना दिवसाचं कामकाज स्थगित करावं लागलं. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना विरोधक काय रणनिती आखून सभागृहात येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
