कोरोनाची पहिली लाट असो वा दुसरी, कोरोनाची रुग्णसंख्या आणि खासकरून मृत्यू लपवल्याचा आरोप झाला. महाराष्ट्रात भाजपने महाविकास आघाडी सरकारवर केला, तर देशातसुद्धा उत्तर प्रदेश आणि गुजरात रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे लपवत असल्याचा आरोप झाला. अर्थात प्रत्येकाने आपापल्या परीने ते नाकारलेच, पण अखेर सुप्रीम कोर्टात याची पोलखोल झालीच, आणि आपल्या शेजारच्याच गुजरात राज्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे आकडे दुपटीने वाढले. नेमकं काय घडलंय, समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT