Manoj Jarange : राज्यात तिसरी आघाडी होणार? जरांगे-संभाजीराजे भेटीत काय झाली चर्चा ?

संभाजीराजे आणि मनोज जरांगे यांच्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.

मुंबई तक

15 Aug 2024 (अपडेटेड: 15 Aug 2024, 03:18 PM)

follow google news

SambhajI Raje Meet Manoj Jarange : जालना : संभाजीराजे आणि मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी नवी समीकरणं ठरवण्याबाबत चर्चा झाली. संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं, तर मनोज जरांगे यांनी गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी नवी समीकरणं गरजेची आहेत असा मुद्दा मांडला.

या बैठकीत आघाडीचे संकेत देण्यात आले. दोन्ही नेत्यांच्या या बैठकीची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय झाला आहे.