महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात, नागपूर दौरा सुरू

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नागपूर ते बिलासपूर या वंदेभारत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते बिलासपूर हे अंतर अवघ्या सहा ते साडे सहा तासांत गाठता येणे शक्य होणार आहे. सध्या हे […]

मुंबई तक

11 Dec 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

follow google news

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नागपूर ते बिलासपूर या वंदेभारत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते बिलासपूर हे अंतर अवघ्या सहा ते साडे सहा तासांत गाठता येणे शक्य होणार आहे. सध्या हे अंतर कापण्यास 7 ते 8 तास लागतात. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेतर्फे ही गाडी चालवली जाणार आहे. 16 कोच असणाऱ्या या गाडीची आसनक्षमता 1 हजार 128 आहे. नागपूर ते बिलासपूरदरम्यान या गाडीला फक्त गोंदिया दुर्ग व रायपूर येथेच थांबा देण्यात आला आहे.

    follow whatsapp