पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. आता दहा दिवस उलटूनही पोलीस तपास पुढे सरकलेला नाही. तिच्या मृत्यूनंतर घटनास्थळी उपस्थित असणा-यांचेही पोलिसांकडून पुन्हा जबाब नोंदवले गेले नसल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे भाजपकडून कथित मंत्र्य़ाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याबाबतही स्पष्ट माहिती समोर येत नाही. त्यामुळे या प्रकरणातले गूढ वाढत चालले आहे. अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT