टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर १० विकेट राखून विजय मिळवला. वर्ल्डकप लढतीच्या इतिहासात पाकिस्तानने भारतावर मात करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. परंतू या विजयानंतर विविध प्रकारच्या वक्तव्य समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाने निराश झालेल्या भारतीय चाहत्यांनी मोहम्मद शमीला ट्रोल केल्याचं प्रकरण ताजं असताना माजी पाकिस्तानी खेळाडू वकार युनूसच्या वक्तव्याने नवीन वादाला सुरुवात झाली. शिवाय पुजा ददलानीची जुनी पोस्टही सध्या चांगलीच चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT