रामदास आठवलेंची भूमिका, भारत पाक सामना नको

भारत पाकिस्तान T20 सामन्याला आमचा विरोध आहे अशी सडेतोड भूमिका रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह हेदेखील याबाबत अमित शाह यांना सांगतील असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. सध्या काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत त्यामुळे ही मॅच होऊ […]

मुंबई तक

19 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

follow google news

भारत पाकिस्तान T20 सामन्याला आमचा विरोध आहे अशी सडेतोड भूमिका रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह हेदेखील याबाबत अमित शाह यांना सांगतील असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. सध्या काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत त्यामुळे ही मॅच होऊ नये असं वाटत असल्याचंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp