देशाचे पंतप्रधान मोदींच्या वाराणसीत महाराष्ट्राशी नाळ असलेल्या राणी लक्ष्मीबाईंचं स्मारक का राहिलं दुर्लक्षित?

मुंबई तक

18 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

19 नोव्हेंबर 1828…मणिकर्णिका म्हणजेच वीरांगना झाशीच्या राणीचा जन्मदिन. उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या अस्सी घाटाच्या किनाऱ्यावर असलेल्या या वास्तूत राणी लक्ष्मीबाईंचं बालपण गेलं. पुढे झाशीची राणी म्हणून प्रसिद्ध झालेली मणिकर्णिका आपल्या बालपणाचा काही काळ वाराणसीत गेला. नंतर त्यांचे वडील मोरोपंत त्यांना कानपूरजवळील बिठूर इथे घेऊन गेले. पण वाराणसीतलं हे स्मारक आज दुर्लक्षित आहे. इथे पुरेशा दिव्यांची व्यवस्था […]

Google CTA

19 नोव्हेंबर 1828…मणिकर्णिका म्हणजेच वीरांगना झाशीच्या राणीचा जन्मदिन. उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या अस्सी घाटाच्या किनाऱ्यावर असलेल्या या वास्तूत राणी लक्ष्मीबाईंचं बालपण गेलं. पुढे झाशीची राणी म्हणून प्रसिद्ध झालेली मणिकर्णिका आपल्या बालपणाचा काही काळ वाराणसीत गेला. नंतर त्यांचे वडील मोरोपंत त्यांना कानपूरजवळील बिठूर इथे घेऊन गेले. पण वाराणसीतलं हे स्मारक आज दुर्लक्षित आहे. इथे पुरेशा दिव्यांची व्यवस्था नाही. आठपैकी तीनच दिवे सुरू आहेत. फरशा तुटल्या आहेत. गंगेच्या अस्सी घाटापासून अवघ्या काही पावलांवर असलं तरी या स्मारकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.