मुंबई तक नवाब मलिक यांनी आज ट्विटरवर शेअर केलेल्या एका पत्रानं खळबळ उडालीय. मुंबई एनसीबी कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं आपल्याला हे निनावी पत्र पाठवल्याचा दावा केलाय. याच पत्रावर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई तकला प्रतिक्रियाही दिलीय. मलिक यांनी मंगळवारी सकाळीच एक लिफाफा ट्विट करत समीर वानखेडेंच्या स्पेशल २६बद्दल खुलासा करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतरच एक चारपानी पत्र शेअर आलंय. मलिकांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलिसप्रमुख संजय पांडे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांना मार्क करण्यात आलंय. पत्र लिहिणाऱ्यानं स्वतःची ओळख एनसीबीच्या बेईमानीविरोधात उभा एक सच्चा देशभक्त अशा शब्दांत सांगितलीय. समीर वानखेडे यांच्याविरोधातील कथित एनसीबी अधिकाऱ्याच्या पत्रात काय म्हटलंय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
