शिवसेना नेते संजय राऊत यांनी लखीमपूर खीरी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आम्ही पंतप्रधानांचं रडण सहन करतो, आता पंतप्रधानांनीही शेतकऱ्यांसी दोन अश्रू गाळावेत, असं म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रियंका गांधी यांच्या अटकेचाही निषेध केला. लखीमपूर खीरी प्रकरणावरूनच आज संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT