शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे संकेत दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
देशात आजच्या घडीला आणीबाणीसारखी स्थिती आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आणीबाणीच्या काळात जे घडत होतं तसंच आज घडतं आहे. मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली तर थेट देशद्रोही ठरवलं जातं हे धोरण योग्य नाही, असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT