MBBS ला प्रवेश घेण्यासाठी NEET – नॅशनल एलिजिबीलिटी एन्ट्रन्स टेस्ट देणं सक्तीचं आहे, तरच MBBS ला प्रवेश मिळू शकतो. पण या नीट परीक्षेविरोधात तामिळनाडू सरकारने विधेयक मंजूर करून घेतलं आणि बारावीच्या गुणांआधारे वैद्यकीय प्रवेश दिला जाईल, अशी तरतूद त्यात केलीये. तामिळनाडू सरकारने असा निर्णय का घेतला असेल? सरकारकडून असं करण्यामागचं प्रमुख कारण सांगितलं जातंय, तामिळनाडूतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणारा मोठा फटका. मग अशी परिस्थिती महराष्ट्रातही असू शकते, त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का? समजून घेऊयात…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT