Honour Killing : अंगाची हळद फिटण्याआधीच पतीची हत्या, पत्नीने फोडला टाहो

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहातून हत्येच्या घटना महाराष्ट्राला नवीन नाहीत. अमित आणि विद्याने संरक्षण मागितलेलं असताना, त्यांना सुरक्षा देण्यात का झाली नाही हा प्रश्न पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रकाश टाकतो.

मुंबई तक

29 Jul 2024 (अपडेटेड: 29 Jul 2024, 10:05 AM)

follow google news

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहातून नवदाम्पत्याच्या हत्या झाल्याच्या घटना महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. काही महिन्यांपूर्वी संभाजीनगरच्याच वैजापूर तालुक्यातील लाडगावमध्ये अशाच एका प्रकरणातून मुंडकं छाटून एकाची हत्या करण्यात आली होती. जातीच्या खोट्या अस्मितेतून आणि अहंकारातून या हत्या होणार असतील तर हे काही निरोगी समाजाचं लक्षण नाही. याशिवाय अमित आणि विद्याने संरक्षण मागितलेलं होतं, तरी त्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही?, या प्रश्नावरून पोलिसांचा निष्काळजीपणा समोर येतो. अशा घटनांना समाज म्हणून आळा घालणं गरजेचंच, पण प्रशासनानेही अशा प्रकरणांना संवेदनशीलपणे हाताळायला हवं. आरोपींना कायदेशीर शिक्षा होईलच पण अशा घटनांमुळं माणसातल्या माणूसकीचा ऱ्हास होऊ नये, एवढंच.

    follow whatsapp