पूजा चव्हाण नावाच्या तरूणीने काही दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केल्यानंतर आता राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे, असं म्हणत, भाजप नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT