महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यातील वादात हायकोर्टाने सोमवारी महत्त्वाचं विधान केलं आहे. राज्यपालांना अधिकार आहेत तसेच त्यांची घटनात्मक कर्तव्य आहेत असं विधान मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने केलं आहे. सोमवारी 19 जुलैला विधानपरिषदेत 12 आमदारांच्या नियुक्तीच्या याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी पूर्ण केली आणि निर्णय राखून ठेवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT