एनसीबीतले दबंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे समीर वानखेडे यांनाच आता अटकेची भीती सतावतेय का, असा सवाल निर्माण झालाय. मला चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचा कट रचला जातोय, माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणत वानखेडेंनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतलीय. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहून वानखेडेंनी आपली भीती बोलून दाखवलीय. या पत्रात काय म्हटलं, पत्राचं टायमिंग काय आणि हे संपूर्ण प्रकरण काय, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
