एखाद्या देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कुणाचं असतं? तिथल्या यंत्रणांचं असतंच पण त्याची जबाबदारी अखेर येते ती कायदे मंत्र्यावर. मात्र भारतात कायदेमंत्र्यांनीच कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. हो….आपण भारताचे कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याविषयीच बोलतोय… 25 जूनला रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलं. पण रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर केलेल्या एका ट्विटमुळे असं काय घडलं? की ट्विटरला एका देशाच्या मंत्र्यांचं अकाऊंट लॉक करण्याची वेळ आली? हेच आज समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT