Dindori Lok Sabha Election 2024: दिंडोरी: नाशिक लोकसभा मतदारसंघाला लागूनच असलेला दिंडोरी मतदारसंघ हा काहीसा दुर्लक्षित असलेला भाग.. मात्र, 2019 लोकसभेनंतर हा मतदारसंघ अचानक चर्चेत आला. ज्याची सुरुवातच उमेदवारीपासून झाली. 2014 साली ज्या भारती पवार यांना पराभूत करण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावलेली त्याच भारती पवारांना भाजपमध्ये आणण्याची एक वेगळी खेळी इथं खेळली गेली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी देऊन भाजपने आपला डाव यशस्वीही करून दाखवलेला. (ganit lok sabhecha see how the political mathematics will be done in dindori constituency at the time of lok sabha elections 2024)
ADVERTISEMENT
पण एवढ्यावरच न थांबता पहिल्याच टर्ममध्ये निवडून गेलेल्या भारती पवारांना चक्क केंद्रात राज्यमंत्री पदही देण्यात आलं. ज्यामुळेच सर्वांच्या भुवयाही उंचावललेल्या त्यामुळेच आता या मतदारसंघाकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत...
दिंडोरी मतदारसंघाचा इतिहास
पंतप्रधान मोदी हे धक्कातंत्रासाठी खूपच प्रसिद्धए येत. मग ती कोणाची उमेदवारी असो किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री ठरवणं असो.. ते कायमच सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतात. असाच एक निर्णय त्यांनी 7 जुलै 2021 रोजी घेतला होता.
कोरोना काळानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार केलेला. ज्यासाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांची नावं ही चर्चेत होती. मात्र, कोणाच्याही ध्यानीमनी नसणाऱ्या नावाला मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलेलं. हेच नाव म्हणजे भारती पवार.
थेट राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आणि पहिल्याच टर्ममध्ये संसदेत पोहचलेल्या भारती पवारांना केंद्रात राज्यमंत्री पद देऊन मोदींनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेला. राज्यात भाजपमध्ये अनेक दिग्गज नेते आणि खासदार असतानाही मोदींनी भारती पवार यांना आपल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून घेतलं. एवढंच नव्हे तर आरोग्य खात्यासारखं अत्यंत महत्त्वाचं खातंही त्यांच्याकडे दिलं. त्यामुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांच्या दिंडोरी या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंए.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सलग तीन टर्म भाजपचाच खासदार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय. मात्र, यंदा भाजपसाठी येथील लढाई सोप्पी नसणारेए..
शरद पवार देणार धक्का?
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारण हे पूर्णपणे बदलून गेलंय त्यातही राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार हे स्वत: नाशिक जिल्ह्यात जातीने लक्ष देतायेत. फुटीनंतर त्यांनी येवल्यात जाहीर सभा घेऊन येथे वातावरण निर्मिती केलीए. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून ते सरकारला सातत्याने घेरतात.. ते वारंवार नाशिक जिल्हा आणि पर्यायाने दिंडोरी मतदारसंघासाठी व्यूहरचना देखील करतायेत. याचाही बराच परिणाम हा यंदाच्या निवडणुकीत होऊ शकतो. पण दुसरीकडे शिवसेनेत जी फूट पडलीए. त्याचा बराचसा फायदा येथे भाजपला होऊ शकतो.
दुसरीकडे या मतदारसंघात माकपची देखील बरीच ताकदए. कारण माकपचे जीवन गावित यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 1 लाखाहून अधिक मतं मिळवलेली. त्यामुळे जर माकप आणि मविआ या निवडणुकीत एकत्र आले तर भाजपसाठी ही निवडणूक नक्कीच सोप्पी नसेल.
ADVERTISEMENT