ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली.
टीम इंडिया कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
बीसीसीआयने शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीममध्ये कोणताही बदल केला नाही, पण मोठा निर्णय घेतला.
कसोटी सामन्यांसाठी टीमची घोषणा होताच, बीसीसीआयने केएल राहुलला मोठा धक्का दिला.
राहुलने जानेवारी 2022 पासून आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत.
केएल राहुल खराब फॉर्ममुळे आता उपकर्णधार नसणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या टीममध्ये केएल राहुलच्या नावासोबत उपकर्णधार असं लिहिलेलं नाही.
यावेळी बीसीसीआयने टीम इंडियाच्या उपकर्णधाराचे नावही जाहीर केलेलं नाही.
ADVERTISEMENT