Nuclear War: अर्ध्या तासात 10 कोटी लोकांचा मृत्यू, जाणून घ्या अणुयुद्ध झाल्यास काय होईल?

मुंबई तक

अचानक सकाळी मोठा आवाज झाला आणि क्षणार्धात हजारो लोक मेले तर? प्रचंड मोठा स्फोटानंतर सर्वत्र शांतता आणि काही वेळाने लोकांच्या रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येऊ लागला तर? असाच काहीसा प्रकार ऑगस्ट 1945 मध्ये घडला होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुहल्ला केला होता. हे हल्ले इतके जोरदार होते की काही मिनिटांतच लाखो लोक मरण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

अचानक सकाळी मोठा आवाज झाला आणि क्षणार्धात हजारो लोक मेले तर? प्रचंड मोठा स्फोटानंतर सर्वत्र शांतता आणि काही वेळाने लोकांच्या रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येऊ लागला तर? असाच काहीसा प्रकार ऑगस्ट 1945 मध्ये घडला होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुहल्ला केला होता. हे हल्ले इतके जोरदार होते की काही मिनिटांतच लाखो लोक मरण पावले आणि त्यानंतरही वर्षानुवर्षे लोक मृत्यूमुखी पडतच होते.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात पुन्हा अणुयुद्धाचा धोका वाढला आहे. ही लढत जवळपास निर्णायक वळणावर आली असली तरी धोका टळलेला नाही. अमेरिकेसह पाश्चिमात्य देश युक्रेनला मदत करत आहेत आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आधीच इशारा दिला आहे की, इतर देशांनी हस्तक्षेप केल्यास असे परिणाम होतील की जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नाहीत. काही तज्ज्ञांच्या मते, पुतिन यांचा हा इशारा म्हणजेच अणुयुद्धाला सुरुवात होऊ शकते.

जपानवर झालेल्या अण्वस्त्र हल्ल्यातून जे वाचले ते आजही तो दिवस आठवून प्रचंड घाबरतात. अणुयुद्धामुळे फक्त आणि फक्त विनाशच होऊ शकतो. दुसरं काहीही हाती लागणार नाही.

अणुयुद्ध झाले तर काय होईल?

हे वाचलं का?