पाकिस्तानी एजंटसोबत ‘बेस्ट’चा व्यवहार, आशिष शेलारांचे विधानसभेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई तक

मुंबई: युरोपियन युनियनसह जगातील अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषित केलेल्या आणि पनामा पेपर्समध्य नाव आलेल्या पाकिस्तानी एजंटचा पैसा असलेल्या कंपनीला मुंबईच्या बेस्टच्या ई बसचे कंत्राट देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज (16 मार्च) विधानसभेत केला. हा आरोप त्यांनी थेट पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे. यासोबतच शेलार यांनी महाराष्ट्रातून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: युरोपियन युनियनसह जगातील अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषित केलेल्या आणि पनामा पेपर्समध्य नाव आलेल्या पाकिस्तानी एजंटचा पैसा असलेल्या कंपनीला मुंबईच्या बेस्टच्या ई बसचे कंत्राट देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज (16 मार्च) विधानसभेत केला. हा आरोप त्यांनी थेट पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे.

यासोबतच शेलार यांनी महाराष्ट्रातून 1 हजार कोटींचे बांबू जंगल गायब झाले, तसेच माहूल येथील पर्यावरणाच्या विषयात सरकारने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना अप्रत्यक्ष मदत कशी केली याबाबतची माहिती उघड करून विधानसभेत खळबळ उडवून दिली.

आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेला सुरूवात झाली या चर्चेत सहभागी होताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पर्यावरण विभागाच्या कामावर जोरदार टीका केली. नुकताच बेस्टच्या ताफ्यामध्ये नव्या ई बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबसचे पहिले टेंडर हे केवळ 200 बससाठी काढण्यात आले होते.

शिवाय पुन्हा बसची संख्या वाढवून ती 900 करण्यात आली. पुन्हा यामध्ये वाढ करुन ही संख्या 1400 करण्यात आली. तसेच मुंबईतील रस्त्यावर चाचणी न घेता एवढया बस घेण्याचा निर्णय किती योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. हा व्यवहार ज्या कंपनीशी करण्यात आला त्या व्यवहारावर मात्र गंभीर स्वरूपाचे आरोप आशिष शेलार यांनी केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp