महाराष्ट्राची वाटचाल दुसऱ्या Lockdown च्या दिशेने ? मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई तक

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने येत्या रविवारपासून महाराष्ट्रात जमावबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राची वाटचाल दुसऱ्या दिशेने होते आहे का ? असेच संकेत या वक्तव्यातून होत आहेत. लॉकडाऊन लावण्याची मुळीच इच्छा नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पण वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने येत्या रविवारपासून महाराष्ट्रात जमावबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राची वाटचाल दुसऱ्या दिशेने होते आहे का ? असेच संकेत या वक्तव्यातून होत आहेत. लॉकडाऊन लावण्याची मुळीच इच्छा नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पण वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढते आहे. गुरुवारी दिवसभरात ३५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर गेल्या आठवड्याभरातही रूग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रविवारपासून महाराष्ट्रात जमावबंदीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत Corona चा कहर, दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

कडक निर्बंधांचे संकेत