नागपूरवरुन फोन, सदावर्तेंना आलेला तो मेसेज आणि…जाणून घ्या आज कोर्टात काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद अजुनही राज्यभर उमटत आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. आज झालेल्या सुनावणीत गिरगाव कोर्टाने सदावर्ते यांची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गामदेवी पोलीस ठाण्याने पवारांच्या […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद अजुनही राज्यभर उमटत आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. आज झालेल्या सुनावणीत गिरगाव कोर्टाने सदावर्ते यांची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गामदेवी पोलीस ठाण्याने पवारांच्या घरावर झालेला हल्ला आणि आंदोलनाचा कट कसा रचण्यात आला यासंबंधीचे काही पुरावे मिळाल्याचं कोर्टासमोर सांगितलं.
गुणरत्न सदावर्ते यांच्याव्यतिरीक्त पोलिसांनी 110 कर्मचाऱ्यांना अटक केली असून या कर्मचाऱ्यांपैकी मोहम्मद ताजिउद्दीन शेख, कृष्णकांत कोरे, सविता पवार आणि अभिषेक पाटील या चार कर्मचाऱ्यांची कस्टडी पोलिसांनी मागितली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितल्याप्रमाणे अभिषेक पाटील याने कर्मचाऱ्यांना पवार यांचं घर दाखवलं. या प्रकरणात आणखी एक आरोपीचा शोध पोलीस घेत असून त्यांचं नाव चंद्रकांत सूर्यवंशी असं आहे. तो MJT Marathi YouTube Channel चालवतो आणि तो देखील या कटाचा सहभाग असल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टासमोर सांगितलं.
पत्रकार पाठवा आणि नागपूरवरुन सदावर्तेंना आलेला तो फोन –
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टासमोर दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाच्या दिवशी सकाळी 10 वाजून 33 मिनीटांनी सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांना आंदोलनाबद्दल माहिती दिली. यानंतर त्यांना नागपूरवरुन एक फोन आला. सदावर्तेंच्या मोबाईलवर एक मेसेज आला, ज्यात त्यांना पत्रकार पाठवा असा संदेश देण्यात आला. हा आंदोलनाला आर्थिक सहाय्य कुठून मिळालं याचा तपास करण्यासाठी सदावर्तेंची कस्टडी मिळणं गरजेचं आहे. सदावर्ते म्हणतात की त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून त्यांची बाजू मांडण्यासाठीचे पैसे घेतले नाहीत. परंतू प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 550 रुपये गोळा करण्यात आले जी रक्कम 1 कोटी 80 लाखांच्या घरात गेली. त्यामुळे या पैशांचा वापर कसा झाला याचाही तपास होणं गरजेचं असल्याचं घरत यांनी कोर्टासमोर सांगितलं.










