आजी-माजी एकत्रित आले तर भावी सहकारी; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी, भाजपला खुणावलं

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला युतीसाठी इशारा तर केला नाही ना’, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला युतीसाठी इशारा तर केला नाही ना’, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी शहरातील सिद्धार्थ उद्यानात असलेल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या अनावरण कार्यक्रमाला हजेरी लावली.

या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे यांनी नेहमीच्या शैलीत टोलेबाजी केली.

दानवे यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी दानवे यांच्या मुंबई-नागपूर मेट्रो प्रकल्पाबद्दल भाष्य केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp