उजनीच्या पाण्यावरुन संघर्ष कायम, इंदापुरात आंदोलनाला सुरुवात

मुंबई तक

उजनी धरणाच्या पाणीवाटपावरुन निर्माण झालेला संघर्ष अजुनही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. उजनी धरणातलं ५ टीएमसी पाणी इंदापुरातील गावांना वळवण्याच्या पालकमंत्री दत्ता भरणेंच्या निर्णयाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती दिली. सोलापुरात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं असलं तरीही इंदापुरात आता या निर्णयाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. उजनीच्या पाण्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी, शिवसेना आमदाराची शरद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

उजनी धरणाच्या पाणीवाटपावरुन निर्माण झालेला संघर्ष अजुनही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. उजनी धरणातलं ५ टीएमसी पाणी इंदापुरातील गावांना वळवण्याच्या पालकमंत्री दत्ता भरणेंच्या निर्णयाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती दिली. सोलापुरात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं असलं तरीही इंदापुरात आता या निर्णयाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

उजनीच्या पाण्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी, शिवसेना आमदाराची शरद पवारांवर घणाघाती टीका

इंदापुरातील काही शेतकऱ्यांनी आज पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येऊन झाडाच्या फांद्या आणि टायर जाळत जयंत पाटलांच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे उजनीच्या पाणीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था कोंडीत अडकल्यासारखी झाली आहे. इंदापुरात आज झालेल्या आंदोलनात आरपीआयच्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सहभाग घेत जयंत पाटलांच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली.

काय आहे वादाचा मुद्दा??

हे वाचलं का?