Wagh Nakh : आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर ‘बाण’, शहाजी पाटलांनी केला पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shahaji bapu patil recites aaditya thackeray after he target to eknath shinde.
Shahaji bapu patil recites aaditya thackeray after he target to eknath shinde.
social share
google news

-गणेश जाधव, धाराशिव

Shahaji Bapu Patil News : आदित्य ठाकरेंनी आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना परदेश दौऱ्यावरून घेरलं, नंतर वाघनखांवरून प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री शिंदेंवर आदित्य ठाकरे सातत्याने बाण डागताना दिसत आहेत. पण, वाघनखांवरून केलेल्या प्रश्नानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पलटवार केला. शहाजी बापू पाटलांनी आदित्य ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरेंनाही डिवचलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परदेश दौऱ्यावर जाणार होते. त्यावरून ‘तुम्ही परदेशात जाऊन काय करणार?’, आदित्य ठाकरेंनी टीका केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी ये डर अच्छा लगा असं म्हणत टोला लगावला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘हे वेळीच थांबवलं पाहिजे’, राज ठाकरेंनी गणेश मंडळांना झापले, सरकारला…

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरेंनी वाघनखांवरून सरकारला लक्ष्य केलं. राज्य सरकार लंडनमधील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियमधील वाघनखं काही काळासाठी महाराष्ट्रात आणणार आहे. त्यावरून आदित्य ठाकरेंनी सवाल केला की, ‘ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत का?’

शहाजी बापू पाटलांनी ठाकरेंवर केला वार

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उत्तर दिलंय. “घरात कोंडून घेऊन कुलूप लावून बसण्यापेक्षा विदेश दौरा केलेला कधीही बरा. राज्याची प्रगती करण्यासाठी विदेश दौरा गरजेचं असतो. ते प्रगतीचे लक्षण आहे”, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शिवाजी महाराज वाघनखे : लंडनच्या संग्रहालयातील ‘ती’ वाघनखं खरी की खोटी, वाद काय?

“आदित्य ठाकरे यांनी वाघनखे खरी की खोटी यावर चर्चा करू नये. वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची आहेत, त्यावर ब्र शब्द बोलू नये. शिवसेनेचा खरा वाघ एकनाथ शिंदे, ते मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात आली”, असे म्हणत पाटलांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

ADVERTISEMENT

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

आदित्य ठाकरेंनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केले. “मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आम्ही आग्रही नाही. 30 मंत्री काम करीत असून, 10 जागा राहिल्या आहेत. थोड्या दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल. जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य व्यक्तींना स्थान देतील. बच्चू कडू सोडून गेलेले नाहीत, ते महायुती सोबत असल्याचे मागील कार्यक्रमावरून दिसते”, असे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT