IND vs WI 3rd ODI : भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा; दणदणीत विजयासह मालिका टाकली खिशात

मुंबई तक

तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने एकदिवसीय मालिका खिशात टाकली. तिन्ही सामने जिंकत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ९६ धावांनी धुव्वा उडवला आणि मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. पहिले दोन सामने जिंकत २-० अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने एकदिवसीय मालिका खिशात टाकली. तिन्ही सामने जिंकत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ९६ धावांनी धुव्वा उडवला आणि मालिका ३-० अशा फरकाने जिंकली.

पहिले दोन सामने जिंकत २-० अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात विजयाची पुनरावृत्ती केली. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात निराशाजनक झाली. ४२ धावांवरच भारताचे तीन खेळाडू बाद झाले होते. रोहित शर्मा १३ धावा करून बाद झाला. तर त्यापाठोपाठ विराट कोहली एकही धाव न करता तंबूत परतला. शिखर धवनही १० धावांवर बाद झाला.

४२ धावांवरच तीन महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले असताना श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतने सावध खेळी करत डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने ५४ चेंडूत ५६ धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने १११ चेंडूत ८० धावा केल्या.

त्यानंतर अष्टपैलू दीपक चहरने ३८ चेंडूत ३८ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही ३४ चेंडूत ३३ धावा करत भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास हातभार लावला. दीपक चहर आणि सुंदरने ५३ धावांची भागीदारी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp