सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असं करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
Photo Credit; instagram
रात्रभर झोपल्यानंतर आपलं शरीर काही प्रमाणात डिहायड्रेटेड होतं. अशातच सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीर रीफ्रेश होतं.
Photo Credit; instagram
सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. मात्र, सकाळी नेमकं किती प्रमाणात पाणी पिणं योग्य असतं? याविषयी जाणून घ्या.
Photo Credit; instagram
तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 ग्लास (200 ते 800 मिली) पाणी पिणं शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं.
Photo Credit; instagram
यामुळे शरीर हायड्रेटेड होण्यास आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. यामुळे मेटाबॉलिजम देखील बूस्ट होतं आणि शरीरातून विषारी घटक बाहेर पडून शरीर अॅक्टिव्ह राहतं.
Photo Credit; instagram
सकाळी उठल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. याव्यतिरिक्त, कोमट किंवा सामान्य तापमानावरील पाणी प्या. हे आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असतं.
Photo Credit; instagram
सकाळी उठल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे पोटात गॅस किंवा जळजळ होऊ शकते.
Photo Credit; instagram
नेहमी बसून आणि आरामात पाणी प्यायलं पाहिजे. अशा पद्धतीने पाणी प्यायल्याने आरोग्याला चांगला फायदा मिळतो.
Photo Credit; instagram
सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 ग्लास पाणी पिण्याची सवय असायला हवी. यामुळे दिवसभर तुमचं शरीर उत्साही आणि हल्कं राहतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
30 वर्षानंतर महिलांच्या शरीरात काय होतात बदल? माहिती वाचून धक्काच बसेल!