'या' बोटात घाला चांदीची अंगठी; पैशांची अडचण दूर होईल अन्...
Photo Credit; instagram
लोक बोटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धातुंच्या अंगठ्या घालतात. फॅशन व्यतिरिक्त, अंगठी घालण्यामागची बरीच धार्मिक कारणे आहेत.
Photo Credit; instagram
चांदीची असो किंवा सोन्याची... अंगठी घालताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. त्यामुळे अंगठी घालण्याचे चांगले लाभ होतात.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार, तर्जनी म्हणजेच हाताच्या पहिल्या बोटात चांदीची अंगठी घालणं शुभ मानलं जातं. यामुळे सौभाग्य मिळतं आणि जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात.
Photo Credit; instagram
हाताच्या मधल्या बोटात चांदीची अंगठी घालणं अशुभ मानलं जातं. हे बोट शनी ग्रहाशी संबंधित असून या ग्रहाचा प्रभाव संतुलित ठेवण्यासाठी खास रत्नांचा वापर केला जातो.
Photo Credit; instagram
चांदीची अंगठी घातल्याने ग्रहाचं संतुलन प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे कधीच मधल्या बोटात चांदीची अंगठी घालू नये.
Photo Credit; instagram
अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूच्या बोटात चांदीची अंगठी घालू शकता. यामुळे शरीरातील ऊर्जा नियंत्रणात राहते आणि मानसिक शांतता मिळते.
Photo Credit; instagram
हाताच्या लहान म्हणजेच करंगळीच्या बोटात चांदीची अंगठी घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. या बोटाचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो.
Photo Credit; instagram
हाताचा अंगठा गुरु ग्रहाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. या बोटात चांदीची अंगठी घालणं सौभाग्य आणि विकासाचं प्रतीक मानलं जातं. यासोबतच आर्थिक वृद्धी देखील होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : सगळेच म्हणतात स्प्राऊट्स खा, पण फायदा काय? जाणून घ्या...