PM Modi : "मी 2029 ची तयारी करत नाहीये तर...", मोदींनी सांगितला खरा प्लॅन

मुंबई तक

• 10:40 PM • 16 Mar 2024

pm modi news : राजधानी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय इंडिया टुडे कॉन्क्लेव्हची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०४७ च्या निवडणुका जिंकण्याचा प्लॅन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची पुढचा प्लॅन इंडिया टुडे कॉनकेल्व्हमध्ये सांगितला.

follow google news

India Today Conclave 2024 : राजधानी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय इंडिया टुडे कॉन्क्लेव्हची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने झाली. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचे हे पहिलेच भाषण होते. इंडिया टुडे ग्रुपचे चेअरमन आणि एडिटर-इन-चीफ अरुण पुरी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी अरुण पुरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी त्यांचा खरा प्लॅन सांगितला. 

हे वाचलं का?

अरुण पुरी पंतप्रधानांना म्हणाले, 'मला तुम्हाला काही विचारायचे आहे. निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तुम्ही दक्षिण भारतात भरपूर दौरे करत आहात. मला हे देखील माहित आहे की तुम्ही खूप पुढचा विचार करता. तेव्हा माझ्या लक्षात आले की तुम्ही 2024 ची नव्हे तर 2029 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहात. यात काही तथ्य आहे का?' या प्रश्नाचे उत्तर आपल्या भाषणाच्या सुरुवातीला देताना पंतप्रधान म्हणाले, 'अरुणजी, तुम्ही तुमच्या संपूर्ण टीमला कामाला लावा की, मोदी आहेत तरी काय? ते शोधा. तुम्ही 2029 वर अडकले आहात. मी 2047 ची तयारी करत आहे."

'याला म्हणतात मोदींची गॅरंटी'

पंतप्रधानांचे स्वागत करताना अरुण पुरी म्हणाले, 'पंतप्रधानजी, गेल्या वर्षी मी तुम्हाला याच व्यासपीठावर विनंती केली होती की तुम्ही नक्की परत या. तुम्ही आलात. मला कळले आहे की तुम्ही तुमच्या दक्षिण दौऱ्यावरून विशेषतः आमच्यासाठी परत आला आहात आणि उद्या सकाळी परत जाणार आहात. इंडिया टुडेच्या वतीने मी तुमचा खूप आभारी आहे. याला 'मोदींची गॅरंटी' म्हणतात.

यावेळी मोदींनी आपल्या भाषणात पीएम स्वानिधी योजनेवर लक्ष केंद्रित केले आणि सांगितले की या योजनेच्या माध्यमातून रस्त्यावरील विक्रेत्यांना प्रथमच स्वस्त आणि सुलभ कर्ज मिळाले आहे. आणि तेही हमीशिवाय. रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज देण्यामागील कारण माझ्या आयुष्याचा अनुभव. इतक्या वर्षात मी जे काही पाहिलं ते मला कळलं आणि हा विश्वास माझा विश्वास बनला, कारण मी गरीबांची श्रीमंती पाहिली आणि श्रीमंतांची गरिबीही पाहिली. आणि म्हणूनच रस्त्यावर विक्रेत्यांना कोणतीही हमी न देता कर्ज देण्याचे धाडस माझ्यात आले.

तुम्हाला कोरोनाचा काळ आठवतो: पंतप्रधान मोदी

पीएम मोदी पुढे म्हणाले की, मी दोन-तीन दिवसांपूर्वीच दिल्लीत रस्त्यावरील विक्रेत्यांची परिषद आयोजित केली होती, जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून रस्त्यावरील विक्रेते आले होते. पण मीडियात यावर चर्चा झाली नाही, पण आज या व्यासपीठावर मी रस्त्यावरील फेरीवाल्यांचे कौतुक करणार आहे. तुम्हाला कोविडचा काळ आठवतो, त्यांच्याशिवाय तुमचे आयुष्य किती त्रासदायक झाले होते आणि मी त्याच दिवशी ठरवले होते की मी त्या सर्वांचा आदर करीन.

'डिजिटल इंडियाच्या क्रांतीचा चेहरा म्हणजे रस्त्यावरील विक्रेते'

रस्त्यावरील विक्रेत्यांनी डिजिटल इंडियाचा अवलंब केल्यामुळे त्यांचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. ते खूप मोठे काम आहे. ज्यांना निरक्षर म्हणत त्यांचा अपमान करण्यात आला. ते रस्त्यावरचे विक्रेते आज भारताच्या डिजिटल क्रांतीचा चेहरा बनले आहेत. या लोकांच्या मेहनतीला माध्यमांमध्ये ठळकपणे ठळकपणे मांडणे फार गरजेचे आहे, असेही मोदी म्हणाले.

    follow whatsapp